Pantpradhan Jan-Dhan Yojana : देशातील प्रत्येक गरीब व्यक्तीला बँकिंग सेवेचा लाभ मिळावा. यासाठी केंद्र सरकारने जनधन योजना आणली होती. या योजनेला दहा वर्षे पूर्ण होत आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान जन धन योजना एक दशक पूर्ण झाल्याचा आनंदोत्सव साजरा केला जात आहे.
LPG सिलेंडरच्या नियमामध्ये एक सप्टेंबर पासून होणार मोठे बदल; ग्राहकांच्या खिशावर होणार परिणाम
लवकर कर्ज हवे असेल तर CIBIL स्कोर किती असावा? CIBIL स्कोर कसा सुधरायचा सोपा मार्ग
केंद्र सरकारने 28 ऑगस्ट 2014 रोजी ही योजना सुरू केली. पंतप्रधान जन धन योजनेचे माध्यमातून देशातील गरीब आणि वंचित घटकांना बँकिंग व्यवस्थित जोडण्यात सरकारला यश आले. यासोबतच सामाजिक सुरक्षा योजना थेट लाभार्थ्यांना बँक हस्तांतरण म्हणजे डीबीटी द्वारे पोहोचवला जात आहे.
जनधन योजना का आणली ?
मोदी सरकारने पंतप्रधान जन -धन योजना आणण्याचे उद्दिष्ट .लोकांचे आर्थिक सक्षमीकरण करणे आणि गरीब वर्गाला बँकिंग क्षेत्रात जोडणी हा होता. ज्या लोकांना बँकिंग सेवा उपलब्ध नाही ते याद्वारे बँकिंग सुविधाचा लाभ घेऊ शकतात. प्रधानमंत्री जन धन योजना अंतर्गत खाते उघडण्यासाठी एक रुपयाचाही गरज नाही. किंवा त्यात किंवा शिल्लक ठेवण्याची गरज नाही. यामध्ये कोणतेही व्यक्ती शून्य शिल्लक असतानाच खाते उघडू शकते. खातेधारकाला रुपये डेबिट कार्ड मोफत दिले जाते.